नागरिकांत भीतीचे वातावरण@जानाळा – कातांपेठ रस्त्यावर नागरिकांना वाघोबाचे दर्शन

19

चंद्रपूर- गडचिरोली मार्गावरील मूल तालुक्यातील जानाळा – कांतापेठ रस्त्यावर वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्येभीतीचेवातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक रहिवाशांनी रस्त्याच्या कडेला वाघ फिरताना पाहिले आणि त्वरित याची माहिती वनविभागाला दिली.
एका दिवसाअगोदरच वाघाच्या हल्यात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी
असतानाच त्याच रात्री रस्त्यावर वाघ फिरतांना आढळल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. मुल तालुक्यात १७ दिवसात ११ जणांचा वाघाच्या हल्ल्यात बळी गेल्याने नागरिक भयभीत असून
ये – जा रस्त्यावरून करण्यापासून तर शेतात कसे जावे ? असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.
प्रत्यक्षदर्शीच्या मते, वाघ काही वेळ रस्त्याच्या कडेला थांबून नंतर जंगलाच्या दिशेने निघून गेला. परिसरातील शाळा, शेती व बाजारपेठेत या घटनेची चर्चा रंगली असून नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला एकमेकांना दिला आहे.