मूल :— आज अकरावी प्रवेश प्रक्रिया चालू होणार ग्रामीण भागातील विद्यार्थी आपले दस्तऐवज घेवून आॅनलाईन सुविधा मध्ये फॉर्म भरण्यासाठी गेले असता संकेतस्थळ ओपण केल्यानंतर दिवसभर चालू न झाल्यामूळे दिवसभर एकही अर्ज झालेला नाही.
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत मोठी अडचण…..
ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत पहिल्याच दिवशी मोठी अडचण आली आहे. ऑफिशियल संकेतस्थळावर क्लिक केले असता साईट अंडर मेंटेनन्स असा मेसेज येत आहे. यामुळे हजारो विद्यार्थ्यांना बसतोय फटका बसत आहे. सोमवार पासून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आज बुधवार सकाळ पासून अनेक विद्यार्थ्यांना ही समस्या भेडसावत असल्याच्या तक्रारी आहेत. शिक्षण विभागाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.
आॅनलाईन अर्ज भरण्यापेक्षा पहिलेचेच प्रवेश प्रक्रिया अंत्यत छान होती कोणत्याही प्रक्रियाचा त्रास न होता सुरळीत कॉल्ेज प्रवेश होत होता आता खुपच किचकट प्रक्रिया झालेली दिसून येत आहे असे विद्याथ्र्याच आइ्रवडील बोलत होते.
आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश बंद
पूर्वी काही खासगी कनिष्ठ कॉलेजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देत शुल्क आकारले
जात होते. परंतु यावर्षीपासून ही पद्धत थांबवण्यात आली असून सर्व प्रवेश
ऑनलाइन आणि क्षमतेनुसारच होतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवेश प्रक्रियेच्या महत्त्वाच्या तारखा काय असतील ?
सध्या महाविद्यालयांची नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. विद्यार्थ्यांना नोंदणी करून, अर्ज भरण्याचा कालावधी १९ ते २८ मे राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना https://mahafyjcadmissions.in या वेबसाइटचा वापर करावा लागेल. विद्यार्थ्यांनी फसवणूक टाळण्यासाठी इतर बनावट वेबसाइटपासून दूर राहण्याची गरज आहे. अर्ज भरण्यासाठी नोंदणी शुल्क केवळ १०० रूपये लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेत शून्य फेरी, चार सामान्य फेऱ्या व विशेष फेरी अशा फेऱ्या राहणार आहेत. त्याचे सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा विद्यार्थ्यांना काय फायदा होईल ?
या प्रवेश प्रक्रियेत भरपूर सुलभता आहे. त्यामुळे विद्यार्थी मुदतीत कुठेही आणि केव्हाही अर्ज करू शकतात. त्यासाठी फक्त इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्याने कोणताही पक्षपात किंवा गैरव्यवहार टाळता येतो. कॉलेजमध्ये जाऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही. प्रवेश प्रक्रियेच्या वेबसाइटमध्ये आवश्यक माहिती, सूचना आणि सुधारणा वेळोवेळी मिळतात. त्यामुळे विद्यार्थ्याला कॉलेजांच्या प्राधान्यक्रमाची निवड करता येते. विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार कॉलेज निवडू शकतात आणि बदलही करू शकतात. कागदपत्रांचे दस्तऐवज अपलोड करणे सोपे आहे. मूळ कागदपत्रांची फोटोकॉपी घेऊन जाण्याची गरज नाही. केवळ स्कॅन करून ऑनलाइन अपलोड करता येतात. एकाच पोर्टलवर सर्व माहिती म्हणजेच एकाच ठिकाणी अर्ज, कॉलेज माहिती, वेळापत्रक, फेऱ्यांचे निकाल सर्वकाही उपलब्ध असते. या प्रक्रियेत आपोआप गुणवत्ता यादी तयार होणार आहे. त्यामुळे गुणांनुसार प्रवेश निश्चित केला जातो. या प्रक्रियेतून प्रवेशासाठी निकोप स्पर्धा आणि न्यायाची संधी मिळते.
नोंदणी करताना अडचण आल्यास, विद्यार्थ्यांनी कोणाकडे संपर्क साधावा ?
ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना अडचण आल्यास, विद्यार्थी किंवा पालक ८५३०९५५५६४ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधू शकतील त्याचप्रमाणे विद्यार्थी support@mahafyjcadmissions.in या ईमेल आयडीवर आपल्या तपशीलासह तक्रार नोंदवू शकतील. तसेच प्रवेशासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय स्तरावर तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन केंद्र स्थापन करण्यात आले असून विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये मदत करण्यासाठी तांत्रिक सहाय्य व मार्गदर्शन केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांवरूनअर्ज भरण्यासाठी मदत करणे, अर्जात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येईल, दाखल करण्यात येणाऱ्या आवश्यक कागदपत्रांची माहिती मिळेल, ओटापी/पासवर्ड विसरल्यानंतरच्या अडचणी सोडवण्यासाठी मदत करण्यात येईल.प्रवेश प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहील, कॉलेज कधी सुरू होतील ?
राज्यातील जवळपास ११ हजार ७०० ज्युनिअर कॉलेजांमधील इयत्ता अकरावीच्या सुमारे १६ लाख ७६ हजार जागांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रवेश फेऱ्यांचा ठराविक टप्पा झाल्यानंतर, साधारण ११ ऑगस्टला कॉलेज सुरू होतील. त्याचप्रमाणे अकरावीची प्रवेश प्रक्रिया १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचा प्रयत्न आहे.