फुले दांपत्यांनी त्यागातून व परिश्रमातून बहुजनांचे जीवन सुगंधी केले. –प्रा. विजय लोनबले

42

क्रांतीज्योती महिला माळी समाज कवडपेठ च्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा जोतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती स्मारकाचा अनावरण सोहळा व महात्मा फुले यांची 198 वी जयंती निमित्त प्रबोधनाचा कार्यक्रम दिनांक 11 एप्रिल 2025 दु.12.00 वा.मुख्य चौकाच्या प्रांगणात संपन्न झाला. अनावरण सोहळा व प्रबोधन कार्यक्रमाचे उद्घाटिका सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ तथा फुले शाहू आंबेडकरी विचारवंत डॉ. अभिलाषाताई गावतुरे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष प्रा. विजय लोनबले होते. प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध पॅथॉलॉजिस्ट डॉ. राकेश गावतुरे, डॉ.पद्माकर लेनगुरे माजी पंचायत समिती सदस्य, श्री. हसनजी वाढई संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुल, श्री. बंडूभाऊ गुरनुले सर माजी प्राचार्य बेंबाळ, ज्ञानज्योती फाउंडेशन सावली चेअध्यक्ष श्री. दिनकरजी मोहुलें, सौ. जस्मिता लेनगुरे सरपंच ग्रामपंचायत चिचाळा, श्री.अनिल भाऊ शेंडे माजी सरपंच ग्रामपंचायत चिरोली, श्री. दशरथजी मांदाळे चिचाळा हेटी श्री प्रकाश पा लेनगुरे अध्यक्ष गाव माळी समाज श्री अतुल निकोडे सदस्य ग्राम पंचायत चिचाळा श्री उमेश नागोसे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती , श्री अविनाश भेंडारे अध्यक्ष संयुक्त वनव्यवस्थापन समिती इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
फुले दांपत्यांचे विचार आत्मसात करून कृती केल्यास समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे आपल्या मुलाबाळांना चांगले शिक्षण देऊन विकास साधावा आणि युवकांनी विविध क्षेत्रात आपला ठसा उंमटवावा, शेती,आरोग्य व शिक्षण या मूलभूत गरजा कडे सरकारने लक्ष द्यावे आणि युवकांनीही सजग राहावं असे मत डॉ. अभिलाषा गावतुरे यांनी व्यक्त केले . अध्यक्षीय भाषणातून प्रा. विजय लोणबले यांनी फुले दांपत्यानी आपल्या त्यागातून व परिश्रमातून बहुजनांचे विविध अंगी जीवन सुगंधी करण्याचे कार्य केले त्याला जगात तोड नाही, महात्मा फुले समाज थोरसुधारक तर होतेच परंतु ते एक यशस्वी उद्योजकही होते ही बाब तरुण पिढीला माहीत असणे आवश्यक आहे. उद्योगातून मिळालेला नफा ते समाज सुधारनेसाठी लावत असत, महापुरुष हे लोकांच्या विचारातून जिवंत असतात, एकदा की त्या महापुरुषांच्या विचाराचा पालन करणारी माणसं संपली ,त्यांच्या वाटेने प्रवास करणारी माणसं संपली की, त्या महापुरुषाचे विचारही संपत असतात. महापुरुषांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता आहे असे परखड मत मांडले. डॉ. पद्माकर लेनगुरे, श्री. बंडूभाऊ गुरुनुले यांनी फुलांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला आणि त्यांच्या विचाराने चालावे व व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष श्री बंडू पाटील वाढई यांनी केले, जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी लेझीम पथकांनी आपले कला कौशल्य दाखवत मान्यवरांना सभास्थळी आणले, विद्यार्थ्यांना महापुरुषाचे पुस्तक भेट देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. मान्यवरांचे शाल व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, कार्यक्रमाचे संचालन श्री. सुनील चापडे सर यांनी केले तर श्री. सुंदर मंगर सर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रांतीज्योती महिला माळी समाज कवडपेठ चे अध्यक्ष बंडू पाटील वाढई, उपाध्यक्ष श्री सुरेश मोहुलें सचिव श्रीमती वर्षा वाढई, कोषाध्यक्ष छायाताई शेंडे सहसाची संध्या गुरनुले , श्री विलास वाढई व इतर सदस्यांनी श्रम घेतले. कार्यक्रमाला तालुक्यातील समाज बांधव, भगीनी व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.