सोमनाथ —मारोडा शेतशिवारात@धान पुंजण्याचे संरक्षण……….

78

धान पुंजण्याचे संरक्षण…. धान कापणी, बांधणी व मळणीचे काम जोमात सुरु आहे. अशातच, मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सोमवारी सकाळी पावसाचे काही थेंबही पडले. मूल तालुक्यातील सोमनाथ —मारोडा शेतशिवारात अवकाळी पावसापासून धान पिकाचे पुंजणे ओले होऊन नुकसान होऊ नये, यासाठी पुंजणे अशा प्रकारे ताडपत्रीने झाकून ठेवले आहेत.

आकस्मिक पाऊसामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

मूल तालुक्यात देखील भात शेतीला मोठा फटका बसला असून एकीकडे यंदा उत्पादन कमी निघण्याची शक्यता असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने होत्याचं नव्हतं झालं आहे. जे पीक येणारे होत ते देखील हिरावल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे.

मात्र ऐन काढणी सुरू असताना अवकाळी पावसाने तडाखा दिला.  भाताचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली. ‘औंदा लय मेहनत घेतली व्हती, पाणी कमी झाला तरी पाणी भरून पीक उभं केलं होतं, पण अवकाळी पावसाने सगळ्या मेहनतीवर पाणी फेरल’, आज या भाताला चांगला भाव मिळणार व्हता, पण आता पावसात भिजल्याने त्याला निम्मा सुद्धा भाव मिळणार नाही,’ आता काय करायचं, असा सवाल उपस्थित करत पाण्यात निपचित पडलेल्या भाताच्या पेंढ्या गोळा करण्यात व्यस्त झाले.

 मुल तालुक्यात एकमेव धानाचे उत्पन्न शेतकरी घेत असून सिंचन सुविधे अभावी केवळ धान हेच एकमेव उत्पन्न शेतकऱ्यांना घ्यावे लागत आहे. एका उत्पन्नाच्या भरोशावर मुल सावली तालुक्यातील शेतकरी बांधव विसंबून आहेत असे असताना ऐन धान फसलची कापनी करण्यात आली असून धानाची कापणी झाल्यानंतर धानाचा दाना पूर्ण वाळविण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागतो परंतु कापणी होऊन चार – पाच दिवस झाले आहेत.तसेच अनेक शेतकऱ्यांची कापणी अजूनही सुरू आहे.

असे असताना आज दिनांक २७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ९-०० वाजता आकस्मिक पाऊस आल्याने मुल चीमढा, बोरचांदली, राजगड, फिस्कुटी, विरई, खेडी, टेकाडी, गडीसुर्ला, जूनासूर्ला, नवेगाव (भू) बेंबाळ, नांदगाव, भेजगावं,हळदी, चीचाला, टाडाळा, जा,चीरोली, कांतापेठ, मारोडा, भादूर्णी, राजोली, चिखली, डोंगरगाव, यांचेसह मुल व सावली तालुक्यातील अनेक गावातील कापलेले धानाच्या सरड्या पूर्ण ओल्या झाल्या असून शेतकऱ्यांच्या हाती आलेले उत्पन्न पाऊसामुळे खराब झाल्याने असंख्य शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे.

तालुक्यातील काही शेतकरी मजुरांच्या हाताने धानाची कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी खर्चाचा बजेट लक्षात घेता हार्वेस्टर मशीन लाऊन धान कापणी व चुरणी एकसाथ केली असून शेकडो क्विनटल धान वाळत ठेवले असून पाण्यात भिजल्याने अतोनात नुकसान झाली आहे. तालुक्यातील शेतकरी बांधव आकस्मिक येत असलेल्या पाऊसामुळे एकही पोता धान घरी आणते की काय ? असा प्रश्न अनेक शेतकरी बांधवांना पडला असून गेल्या दोन वर्षापूरवी अशीच परिस्थिती आली.