मुल शहरातील जुन्या वस्तीमधील@पावसाळ्यापूर्वी रस्ता पूर्ण करण्याची मागणी

27

अर्धवट रस्ते बांधकामामुळे गैरसोय
मूल :- येथील गांधी चौक ते विश्रामगृह रोडपर्यंतचा रस्ता अपूर्ण असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याशिवाय पावसाळ्यात तर येथे तळे साचत असते. त्यामुळे नागरिकांना चांगलीच सर्कस करावी लागत आहे. यापार्श्वभूमीवर सदर रस्ता पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात यावा, अशी मागणी वॉर्ड क्रमांक 12 मधील नागरिकांनी केली आहे.
वॉर्डातील या मुख्य रस्त्यावर पावसाळ्यात कंबरेएवढे पाणी साचते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ये- जा करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो. या सर्व समस्यांमधून सुटका होण्यासाठी या रस्त्याचे काम करण्यात यावे, अशी मागणी येथील नागरिकांनी लावून धरली आहे.

याबाबत जुनी वस्ती( वार्ड क्रमांक 12 ) मधील अर्धवट रस्त्याचे बांधकाम पूर्ण करून देण्यात यावे याकरिता निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आले. वॉर्ड क्रमांक 12 मधील सर्वे नंबर 953 व 938 या जागेतून 4 मीटर रूंद व 35 मीटर पूर्व पश्चिम लांबीचा रस्ता अतिक्रमण असल्यामुळे पूर्णत्वात जाऊ शकला नव्हता, परंतु 8 मे 2023 ला नगरपरिषदेतर्फे अतिक्रमण काढून रस्ता मोकळा झाला असल्यामुळे तातडीने या रस्ताचे बांधकाम करून रस्ता नागरिकांसाठी वाहतुकीसाठी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी वॉर्ड क्रमांक 12 मधील नागरिकांची मागणी आहे.

मागील पावसाळ्यात नागरिकांनी रस्त्याच्या कामासाठी आंदोलन देखील केले. पालिका अधिकाऱ्यांनी पावसाळ्यानंतर रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या रस्त्याचे काम झाले नसून तो रस्ता आजही अर्धवट अवस्थेत आहे. रस्त्याचे काम गेले कित्येक वर्षे झालेले नाही. हा भाग सखल असल्याने पावसाळ्यात दरवर्षी येथे पाणी साचते. थोडासा पाऊस झाला तरी रस्त्यावर पाणी साचते. पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे बंद होते. या त्रासाला नागरिक कमालीचे त्रासले असून गेल्या वर्षी नागरिकांनी संतापून आंदोलन केले होते.
अन्यथा आंदोलन रस्त्याच्या कामासाठी येथील आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, नगर पालिका प्रशासनास अजूनह उदासीन आहे. नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहिला जात आहे. पावसाळ्याअगोदर काम न झाल्यास वॉर्डातील नागरिक आंदोलन करतील. -प्रमोद मशाखेत्री स्थानिक रहिवासी,मुल.