मूल – महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ अंतर्गत राजगड मंडल स्तरावरील ‘समाधान शिबिर’ शनिवार, दि. 10एप्रिल २०२६ रोजी स्व बाबुजी पाटील हायस्कूल राजगड येथे अत्यंत उत्साहात पार पडले. या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाने आपली सेवा थेट जनतेच्या दारात आणली असून, एकाच छताखाली शेकडो नागरिकांचे प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी अजय चरडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर मूल तहसिलचे तहसीलदार मृदुला मोरे,भूमिअभिलेख अधिकारी,नायब तहसिलदार तसेच पदाधिकारी,लोकप्रतिनिधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच,माजी उपसरंपच सदरस्य महसूल मंडळ साजातील ग्रामपंचायत सदस्य तसेच , आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रशासनाने या शिबिरासाठी जय्यत तयारी केली होती, ज्याचा फायदा राजगड मंडळातील गावांना झाला. विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले,डिजिटल ७/१२ आणि २५९ ‘८अ’ उताऱ्यांचे वितरण झाले, फेरफार निकाली काढले असून, सातबारा दुरुस्तीचे अर्ज स्वीकारण्यात आले, अर्जांवर जागीच कार्यवाही करण्यात आली. तसेच शिबिरात भूसंपादन व अकृषक (NA) परवानगीची प्रलंबित प्रकरणे मार्गी लावून गाव दप्तर अद्यावत करण्यात आले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी राजगडचे मंडल अधिकारी ,









