Home आपला जिल्हा Breaking News शेतकऱ्यांची मोठे नुकसान, वनविभागाने तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी

शेतकऱ्यांची मोठे नुकसान, वनविभागाने तात्काळ पंचनामा करुन नुकसान भरपाई द्यावी

133

रब्बी पीक हरभरा कापल्यानंतर रानटी डुकराने केले फस्त !

मूल ■ एका उत्पन्नावर विसंबून राहता बेरोजगारीवर मात करण्यासाठी रब्बी हंगामात स्वतःच्या शेतात पिक घेवुन रोजगार प्राप्त करणाऱ्या प्रशांत मेश्राम यांच्याशेतातील हरबऱ्याची कापणी करूनअसलेल्या हरबरा डूक्करांनी फस्तकेल्याने शेतकऱ्याचे हजारो रुपयाचेनुकसान झालेले आहे.मूलतालुक्यातील मौजा मारोडा येथील
प्रशांत मेश्राम यांनी अडीच एकर शेतात रब्बी हंगामात हरबऱ्याची लागवड केली होती.
        पीक पूर्ण झाल्यावर दोन दिवसापुर्वी काढणीला आलेले चना पीक त्यांनी कापून ठेवले होते. दरम्यान रात्रीच्या वेळेस डुक्कराच्या कळपाणे संपूर्ण चणा फस्त केला आहे. मेश्राम यांच्या जवळपास २० क्विंटल चण्याच्या पिकाची नुकसान झाली असून शेतकऱ्याला मोठ्या आर्थिक नुकसानीला समोरे जावे लागले आहे.

   यावर्षी अनेक शेतकऱ्यांनी चणाचे पीक घेऊन त्यातून आर्थिक नफा मिळविण्याचा प्रयत्न केलेलाअसतानाच वन्यप्राण्याकडुन अशा प्रकारचे नुकसान होत असल्याने वन्यप्राण्याचा बंदोबस्त करण्याचीमागणी केली जात आहे.आधीच आर्थिक तंगीत
असलेल्या शेतकऱ्याच्या हातातोंडातआलेला पिक वन्यप्राणी खाऊन नासाडी करीत असल्यामुळे शेतकरी संकटात सापडत आहेत.

वनविभागाने तात्काळ पंचनामा करुन आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्याने व्यक्त केली आहे.