अवघे २ तास अन् २५ पाहुणे, लॉकडाऊनचं पहिले लग्न उरकले

52

मूल:- आपल्या मुला-मुलीचे लग्र थाटामाटात करण्याची प्रत्येक आई-वडिलांची इच्छा असते. त्यानुसार प्रत्येकच आई वडील आप आपल्या परिने लग्र सोहळयात आपल्या बडेजावपणाचे प्रदर्शन करून समाजात आपली ऐपत दाखविण्याचा प्रयत्न करतात. मात्र,कोरेाना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या लाॅकडाऊनमुळे लग्र सोहळयातील उपस्थिती व वेळेवर निर्बंध लादण्यात आल्याने लग्न्र समारंभातील बडेजावपणाला ‘ब्रेक‘लागला आहे. या निर्मित्य कोरोनानेगरीब-श्रींमतांना एकाच पंक्तीत आणून बसविल्याचे चित्र आहे.

एप्रिलच्या पहिल्या आठवडयापर्यंत काही वर -वधूनंी कोरोनाला वाकुल्या दाखवत अगदी थाटात आपले लग्न्र उरकुन घेतले.मात्र, सध्या राज्य सरकारने लागू केलेल्या लाॅकडाऊनमध्ये लग्न्र सोहळयासाठी 25 व-हाडयांची उपस्थिती आणि 2 तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळेकाही वर- वधुनंी आपले नियोजित लग्र पुढे ढकलले आहे. मात्र,बहुतांश वर -वधू ‘आलीया भोगाशी असावे सदर‘ या
उक्तीप्रमोण आपले मन मोडून लग्र उरकून घेत आहेत.

लग्र सोहळयात बहुतांश आई -वडिलांकडून बडेजावपणाचे प्रदर्शन घडवून आपल्या मुला-मुलींचे लग्न्र अविस्मरणीय
बनिवण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी समाजात आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढून लग्न्र सोळयात पैशाची
उधळपटी केली जाते. या खटाटोपात अनेक मध्यमवर्गीयावर कर्जबाजारी होण्याची वेळ येते.
मात्र, कोरोनामुळे या सर्व बडेजावपणाला ‘ब्रेक‘ लागला असून गरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या मुला-मुलींचे लग्र अगदी साधेपणाने
पार पाडत आहे.

अगदी कमी खर्चात लग्न्रसोहळा आटोपत असल्यामुळे अनेक गरीब व माध्यमवर्गीय आई-वडिलांनी मात्र सुटकेचा निःश्वास
टाकला आहे तर श्रीमंतांनी लग्न्रात आनंद लुटायला न मिळाल्याने निराशा व्यक्त केली आहे.
विशेष उल्लेखनीय म्हणजे,कोरोनामुळे किमान लग्र सोहळयातील गरीब-श्रीमंतामधील दरी नाहिशी झाली असून,कोरोनाने सध्या
सर्वांना एकाच पंक्तीत आणून बसवले आहे.

लग्न समारंभासाठी निर्बंध

  • लग्न समारंभासाठी अवघ्या २५ लोकांच्या उपस्थितीत लग्न सोहळा उरकावा लागणार आहे. इतकेच नाही तर अवघ्या २ तासांत तुम्हाला लग्नाचे सर्व विधी आणि अन्य कार्यक्रम पार पाडणं बंघनकारक आहे.
  • या नियमांचं पालन केले नाही तर तब्बल ५० हजार रुपयांचा दंड कुटुंबांना ठोठावला जाईल. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात लग्न करायचं झाल्यास तुम्हाला सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमांचं पालन करणं गरजेचं आहे.