शिवार योजनेचे मूल तालुक्यात बाबराळा गावात तलाव खोलीकरणाच्या कामाचा भूमिपूजन

26
मुल : तालुक्यातील बाबराळा गावात तलाव खोलीकरणाच्या कामाचा भूमिपूजन बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी तहसीलदार मृदुला मोरे मॅडम व पंचायत समिती गट विकास अधिकारी बी.एच.राठोड, सरपंच धीरज गोहने, नायब तहसीलदार श्री. कुमरे यांचे शुभहस्ते करण्यात आला.याप्रसंगी नागपूर विभाग समन्वयक उमेश पाटील,चंद्रपूर समन्वयक  गुरु गुरनुले,यांचे मार्गदर्शनात तलावातील गाळ काढून शेतकरी आपल्या शेतात टाकणार आहेत. यामुळे शासनाच्या या योजनेमुळे शेतीची गुणवत्ता,पोत वाढेल उत्पादनातही भर पडेल, शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होईल व पाणी साठवण्याची क्षमता वाढेल. पर्यायाने जमिनीची पाणी पातळी वाढेल. गाव विकासाच्या दृष्टीने वाटचाल करेल. यासाठी ही योजना अतिशय उपयुक्त असल्याचे गावकरी बोलून दाखविले आहे.                                                  
शासनाच्या गाळमुक्त धरण गाळ यूक्त शिवार योजने अंतर्गत  शासनातर्फे ग्रामीण भागातील तलावातील गाळ काढून देण्यात येतो. गावातील शेतकऱ्यांनी हा गाळ शेतात नेऊन टाकल्याने जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होते. जमिनीची पोत वाढते.आणि उत्पन्नात देखील उत्तम वाढ होते. आणि शेतकऱ्यांची आर्थिक उत्पन्नात नक्कीच वाढ होते. एवढेच नव्हेतर तलावाचे खोलीकरण झाल्याने पाणी साठवण क्षमता वाढते,भूजल पातळीत वाढ होते, त्यामुळे गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी तलावातील काढलेली गाळ आपल्या शेतात नेण्याचे आवाहन नाम फाउंडेशनी केले आहे. 
मागील वर्षी सुद्धा मुल तालुक्यातील चिखली येथील दोन तलावाचे खोलीकरण करण्यात आले. त्यामुळे दोन्ही तलावात आजही पाणी साचलं आहे.