शेतकऱ्यांसाठी शासनाकडून दिले जाणारे विविध योजनांमध्ये त्याचप्रमाणे अनुदान व अशा नुकसान भरपाई मध्ये दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर बदल केले जात आहेत ना आता शेतकऱ्यांना जर अतिवृष्टी अनुदान व नुकसान भरपाई मिळवायची असेल तर आधार प्रमाणे करण करणे आवश्यक आहे शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असेल अशा शेतकऱ्यांना आता आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असणार आहे.
Aadhaar Card E-KYC – ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे व अतिवृष्टी अनुदान यादी नाव आले असेल तर अशा शेतकऱ्यांनी जवळचे आपल्या सरकार सेवा केंद्रावर जाऊन आधार कार्ड प्रमाणीकरण करून घ्यावे लागेल त्यानंतरच संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यावर अनुदान रक्कम वितरण्याची कारवाई सुरू करण्यात येईल. आधार कार्ड प्रमाणे करण सहज सोप्या पद्धतीने यशस्वी होण्यासाठी शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीमधील शेतकऱ्यांची खालील प्रमाणे कागदपत्रे घेऊन आपल्याजवळ आपले सेवा केंद्र , महा सेवा केंद्र, किंवा ई सेवा केंद्र, CSC केंद्रावर जाऊन आपले आधार कार्ड प्रमाणिकरण करून घ्यावे.
आधार प्रमाणिकरण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ( Aadhaar Card E-KYC Documents )
आधार कार्ड
मोबाईल
यादीतील विशिष्ट क्रमांक बँक पासबुक झेरॉक्स
असे करा आधार प्रमाणीकरण (Aadhaar authentication)
• शेतकऱ्यांना आधार प्रमाणे करण्यासाठी यादीमधील विशिष्ट क्रमांक लिहून आपले सरकार सेवा केंद्रावर जाऊन प्रमाणिकरण करून घ्यावे
जर शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक माहीत नसेल तर माहितीसाठी संबंधित तलाठी कार्यालयात जाऊन संपर्क साधावा
• आधार कार्ड प्रमाणिकरण करण्यासाठी विशिष्ट क्रमांक आधार क्रमांक बँक खाते क्रमांक किंवा अनुदान नुकसान भरपाईचा रकमेमध्ये काही विसंगती आढळल्यास पोर्टल वरील असमतीचे बटन दाबून शेतकरी तक्रार नोंदवू शकतात.
• आधार प्रमाणिकरण करण्यासाठी शेतकऱ्यांना OTP BASED व BIOMETRIC या दोन्ही पद्धतीने करता येणार आहे त्यासाठी सेवा केंद्र चालक तुम्हाला सहकार्य करतील.
• आधार प्रमाणे करण यशस्वी झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना E-KYC झाल्याबाबतची पावती देण्यात येईल. अनुदान यादी पाहण्यासाठी संबंधित तलाठी कार्यालयास जाऊन संपर्क साधावा तिथे तुम्हाला अनुदान यादी व विशिष्ट क्रमांक भेटेल






