शहरात गेल्या वर्षभरात चोरीला गेलेली वाहने सापडण्याचे प्रमाण वाहनांचा तपास लावण्यात पोलिसांना अपयश येत असल्याचे दिसते. त्यामुळे चोरीला गेलेले वाहन परत मिळेल, या आशेवर असलेल्या मुल शहरातील , वाहन परत मिळण्याचा विचारच बंद करावा की काय अशी परिस्थिती आहे. आपल्या वाहनांची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे.
काल दिनांक 10 जानेवारी 2024 ला सायकांळाच्या सुमारास बुधवार बाजारमध्ये गाडी ठेवून मच्छीमार्कट मध्ये गेली असता परत आल्यानंतर त्या जागेवर एम एच 34 बियू 8591 अॅक्टीव्ह 6 जी दिसली नाही मि शोध शोध केली परंतू गाडी मिळाली नाही……….
मूल शहर पोलिस वाहन चोरीची संख्या उल्लेखनीय आहे. वाहन चोरीच्या घटना असून, या गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. २०२3मध्ये वाहने चोरीला गेली होती.
शहरात २०२३ या कालावधीतील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा आढावा घेतल्यास या काळात सरासरी चार ते पाच वाहने चोरीला गेली आहेत. यामध्ये दुचाकी वाहनांचे प्रमाण अधिक आहे.
गुन्हा नोंदवायचाय… थांबा?
वाहन चोरीचा गुन्हा नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलेल्या नागरिकांची थेट तक्रार घेतली जात नसल्याचे काही नागरिकांचा अनुभव आहे. ‘काही भुरटे चोर वाहनातील पेट्रोल संपल्यानंतर वाहन रस्त्यावर सोडून देतात. त्यामुळे तुम्ही शहराच्या विविध भागांत पाहणी करा. वाहन सापडले नाही, तर गुन्हा नोंद करू,’ असा सल्ला पोलिसांकडून नागरिकांना दिला जातो.






