महाराष्ट्र शासन आपल्या राज्यातील नागरिकांसाठी विविध सरकारी योजना राबवित असते त्या योजनांपैकीच एक योजना जिचे नाव Shravan Bal Yojana आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील गरजू, गरीब, आर्थिक दृष्ट्या कमजोर, निराधार वृद्ध व्यक्तींना ज्यांचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त आहे अशा जेष्ठ नागरिकांना महाराष्ट शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेअंतर्गत आर्थिक सहायता केली जाते.गट (ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये 1200/- प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या अथवा नाव नसलेल्या 65 वर्ष व 65 वर्षावरील जेष्ठ निराधार स्त्री पुरुषांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्टीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेमधून प्रत्येक महिन्याला 1500/- रुपयांची आर्थिक सहायता करण्यात येते.
या योजनेस पूरक असलेल्या महाराष्ट्र राज्य शासनाच्या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजने मधून प्रतिमहिना 1500/- रुपये रक्कम निवृत्तीवेतन अनुदान देण्यात येते म्हणजेच या योजनेअंतर्गत लाभार्थी जेष्ठ नागरिकास प्रतिमाह 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य्य दिले जाते.
महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिकांना आर्थिक प्रोत्साहन देऊन या श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या स्वातंत्र्य करणे आणि त्यांचे हाल कमी करून त्यांना आर्थिक सहाय्य्य करून त्यांना आर्थिक स्थेर्य प्राप्त करून देण्याचे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट्य आहे.
आम्ही श्रावणबाळ अनुदान योजनेची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे तुमची हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा जर तुमच्या परिसरात असे कोणी व्यक्ती असतील जे श्रावणबाळ अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छित असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा आमची हि आर्टिकल त्यांना शेयर करा जेणेकरून ते या योजनेचा लाभ घेऊ शकतील.
योजनेचे नाव | Shravan Bal Yojana |
विभाग | सामाजिक न्याय व विशेष सहाय्य्य विभाग |
राज्य | महाराष्ट्र |
कोणी सुरु केली | महाराष्ट्र शासन |
लाभार्थी | महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक |
लाभ | प्रतिमहिने 1500/- रुपये आर्थिक सहायत्ता |
योजनेची सुरुवात | 2016 |
योजनेचे उद्दिष्ट्य | राज्यतील जेष्ठ नागरिकांना आर्थिक सहाय्य्यता करणे |
या योजनेअंतर्गत गट अ आणि गट ब असे दोन गट करण्यात आले आहेत
Shravan Bal Anudan Yojana
गट अ – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या जेष्ठ स्त्री व पुरुषांना या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
गट ब – दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव नसलेल्या जेष्ठ स्त्री व पुरुषांना या गटात समाविष्ट करण्यात आले आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजनेचा उद्देश्य
- महाराष्ट्र राज्यातील जेष्ठ नागरिकांना त्यांच्या वृद्धपकाळात आर्थिक सहाय्य्य करणे जेणेकरून त्यांना त्यांच्या दैनंदिन गरजेसाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये हा उद्देश्य समोर ठेवून या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
- वृद्ध नागरिकांचा आर्थिक विकास करणे.
- वृद्ध नागरिकांचे त्यांच्या वृद्धपकाळात जीवनमान सुधारणे.
- वृद्ध नागरिकांचा सामाजिक विकास करणे
- वृद्ध नागरिकांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.

श्रावणबाळ योजनेची वैशिट्ये
- महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील वृद्ध नागरिकांसाठी श्रावणबाळ योजनेची सुरुवात करण्यात आली आहे.
- राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब वृद्ध नागरिकांसाठी सुरु करण्यात आलेली हि एक अत्यंत महत्वाची अशी एक योजना आहे.
- श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहेत त्यामुळे अर्जदार आपल्या मोबाईल च्या सहाय्याने या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतो त्यामुळे अर्जदाराला शासकीय कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची आवश्यकता भासणार आणि ज्यामुळे अर्जदाराचे पैसे आणि वेळेची बचत होईल.
- श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येईल.
- या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक सहाय्यामुळे लाभार्थ्यास त्याच्या वृद्धपकाळात दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नाही.
शासनाच्या इतर योजना
- राज्य सरकार अपंग व्यक्तींना देत आहे 1 वर्षाचा मोफत बस पास त्यासाठी वाचा अपंग बस सवलत योजना
- स्वतःचे घर बांधण्यासाठी राज्य सरकार देत आहे 2 लाखांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा शबरी घरकुल योजना
- राज्यातील निराधार व्यक्तींना सरकार दरमहिना देत आहे 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य त्यासाठी वाचा संजय गांधी निराधार योजना
- राज्यातील अपंग निराधार व्यक्तींना सरकार मोफत उपकरणाचे वाटप करत आहे त्यासाठी वाचा राष्ट्रीय वयोश्री योजना
- विधवा महिलांना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे वीरभद्रकाली ताराराणी स्वयंसिद्धा योजना
श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यातील 65 वर्षावरील जेष्ठ नागरिक श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी पात्र आहेत.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत मिळणारे फायदे
- श्रावण बाळ योजनेनंतर्गत लाभार्थ्यास राज्य शासनाद्वारे दरमहा 1500/- रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येते जेणेकरून वृद्ध व्यक्ती आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करू शकतील.
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिक आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी होतील
- या योजनेमुळे महाराष्ट्रातील वृद्ध नागरिकांना त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी इतरांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
- या योजनेमुळे जेष्ठ नागरिक त्यांच्या आर्थिक समस्येवर मात करतील.
- वृद्ध नागरिकांचे जीवनमान सुधारेल.
- वृद्ध नागरिक सशक्त व आत्मनिर्भर बनतील.
- वृद्ध नागरिकांचा सामाजिक तसेच आर्थिक विकास होईल.
श्रावणबाळ अनुदान योजनेची पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे
श्रावण बाळ योजनेच्या अटी
- श्रावण बाळ योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातील नागरिकांनाच घेता येईल.
- श्रावण बाळ योजनेअंतर्गत अर्जदार व्यक्ती 15 वर्षांपासून महाराष्ट्र राज्यात वास्तव्य करत असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय 65 वर्ष व 65 वर्षापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे नाव ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे
- लाभार्थ्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- पेक्षा जास्त नसावे.
- बीपीएल (BPL) श्रेणीत नसलेल्या जेष्ठ नागरिकांना सुद्धा या योजनेचा लाभ घेता येतो.
- या योजनेचा लाभ हा फक्त महाराष्ट्रातील जेष्ठ नागरिकांनाच घेता येणार आहे.
- महाराष्ट्र राज्याचं बाहेरील व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्या सरकारी योजनेअंतर्गत पेंशन योजनेचा लाभ घेत असल्यास अशा अर्जदाराचा या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबातील कोण सदस्य जर सरकारी कर्मचारी असेल तर अशा अर्जदारास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
शासनाच्या इतर योजना
- गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक दृष्ट्या बळकट बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे माझी कन्या भाग्यश्री योजना
- मुलींना शारीरिक व मानसिक दृष्ट्या प्रबळ बनविण्यासाठी सरकार ने सुरु केली आहे किशोरी शक्ती योजना
- स्वतःचे घर बांधण्यासाठी सरकार देत आहे 2.5 लाखाचे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा रमाई घरकुल योजना
- सरकार ने मुलींच्या उज्वल भविष्यासाठी सुरु केली आहे एक महत्वपूर्ण अशी योजना त्यासाठी वाचा सुकन्या समृद्धी योजना
- शौचालय बांधण्यासाठी सरकार देत आहे आर्थिक अनुदान त्यासाठी वाचा शौचालय अनुदान योजना
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन अनुदान योजेसाठी आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थी व्यक्तीचा वयाचा दाखला (जन्माचा दाखला/शाळा सोडल्याचा दाखला/आधार कार्ड)
- महाराष्ट्र राज्याचा 15 वर्ष वास्तव्याचा दाखला (डोमेसाइल प्रमाणपत्र/ग्रामपंचायत/नगरसेवक दाखला)
- उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न 21,000/- पेक्षा जास्त नसावे)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- पिवळे (BPL) रेशन कार्ड
- घरपट्टी पावती
- विजेचे बिल
- दारिद्र रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र
- मतदान कार्ड
- मोबाईल नंबर
श्रावणबाळ योजनेअंतर्गत अर्ज रद्द होण्याची कारणे
- अर्जदार व्यक्ती महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्तीचे वय 65 वर्षापेक्षा जास्त नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्तीने अर्जात खोटी किंवा चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- अर्जदार व्यक्ती केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत दरमहा अनुदान प्राप्त करत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
- एकावेळी एकापेक्षा जास्त अर्ज केल्यास बाकीचे अर्ज रद्द केले जातील.
- अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 21,000/- पेक्षा जास्त असल्यास
- ग्रामीण/शहरी भागाच्या दारिद्र रेषेखालील कुटुंबाच्या यादीत अर्जदाराचे नाव समाविष्ट नसल्यास
श्रावणबाळ योजनेअंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत
या योजनेच्या अधिक माहितीसाठी गावातील ग्रामपंचायत कार्यालय/तलाठी किंवा तहसील कार्यालयात संपर्क साधावा व सादर योजनेअंतर्गत अर्ज घ्यावा व अर्जात विचारलेली माहिती भरून योग्य ती कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सोबत जोडून अर्ज सादर करावा व अर्ज भरल्याची पोच पावती संबंधित अधिकाऱ्यांकडून घ्यावी.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत
- अर्जदाराला सर्वात प्रथम शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होम पेज वर वर New User & Register Here वर क्लिक करावे लागेल.
- आता तुम्हाला OPTION १ आणि OPTION २ दिसतील तुम्ही ह्या दोन OPTION पैकी कोणत्याही OPTION ने अर्ज करू शकता.
OPTION १ चा पर्याय निवडल्यास: OPTION १ पर्याय निवडल्यास तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल OTP टाकल्यानंतर तुम्हाला User Id आणि Password बनवता येईल
User Id आणि Password बनवल्यानंतर तुम्हाला Login करून या योजने अंतर्गत विचारलेली तुमची सर्व माहिती (Photo,Identy Proof,Address Proof,Bank Account,IFSC Code,Email इत्यादी) भरावी लागेल.
OPTION 2 चा पर्याय निवडल्यास: OPTION १ पर्याय निवडल्यास तुम्हाला या योजने अंतर्गत विचारलेली तुमची सर्व माहिती (Photo,Identy Proof,Address Proof,Bank Account,IFSC Code,Email इत्यादी) भरावी लागेल नंतर तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल मग तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येईल OTP टाकल्यानंतर तुम्हाला User Id आणि Password बनवता येईल.
- आता तुमच्यासमोर या योजनेचा अर्ज उघडेल त्यामध्ये विचारलेली सर्व माहिती भरून योग्य ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत व सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे.
- अशा प्रकारे तुमची या योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत केलेल्या अर्जाची स्थिती तपासण्याची प्रक्रिया
- सर्वात प्रथम तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- तुमच्या समोर जे होमपेज ओपन होईल त्याच्यावर Track Your Application वर क्लिक करावे लागेल.
- तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक टाकून Go वर क्लिक करावे लागेल.
- आता तुमच्या अर्जाची स्थिती तुमच्यासमोर दिसेल.
श्रावणबाळ योजनेअंतर्गत लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया
- सर्वात प्रथम तुम्हाला शासनाच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.
- होमपेज ओपन होईल त्याच्यावर असलेल्या लाभार्थी यादी वर क्लिक करावे.
- आता तुम्हाला तुमचा जिल्हा/गाव/ब्लॉक निवडावे लागेल व सबमिट वर क्लिक करावे लागेल.
- या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची यादी तुमच्या समोर उपलब्ध होईल.
शासनाच्या इतर योजना
- स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी सरकार देत आहे बिनव्याजी कर्ज त्यासाठी वाचा अण्णासाहेब पाटील कर्ज योजना
- राज्य सरकार महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी देत आहे कर्ज त्यासाठी वाचा महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना
- राज्य सरकार ग्रामीण भागातील कुटुंबांना देत आहे मोफत चूल त्यासाठी वाचा निर्धूर चुल वाटप योजना
- आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना सरकार देत आहे 3 लाखाची प्रोत्साहन राशी त्यासाठी वाचा आंतरजातीय विवाह योजना
- आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबांना सरकार देत आहे 4000/- रुपयांचे अर्थसहाय्य त्यासाठी वाचा खावटी अनुदान योजना