नायब तहसीलदार ओंकार ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयात गुरुवारी संजय गांधी निराधार अनुदान योजना व वृध्द व्यक्तींसाठी श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना राबवत असताना महसूली प्रमाणपत्र व आनलाईन प्रकरणाबाबत आढावा घेण्यासाठी दिनांक २७ एप्रिल२०२३ रोजी दूपारी ३ वाजता तहसील कार्यालयात एका विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.
मुल तालुक्यातील सर्व VLE या सभेत बोलाविण्यात आले होते. शासनाच्या निर्देशाप्रमाणे कोणत्या योजनांसाठीआवश्यक कागदपत्रे कोणती आणि कशी अपलोड करावयाची याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आणि या योजनांचा लाभ ग्रामीण भागातील शेतकरी व गरजूंना पोहोचविणे व त्यांना सहकार्य करणे ह्या बाबतीत योग्य मार्गदर्शन करण्यात आले.
या सभेला या सभेत मूल तालुक्यातील ग्रामीण भागातील व मूल शहरातील संगणक संचालक , आपले सरकार केंद्र संचालक व ग्रामपंचायत संगणक संचालक हे सर्व या सभेला अपेक्षित होते. ज्यांची संख्या ४९ ग्रामपंचायतीचे ४४ संगणक संचालकांसह ६८ आपले सरकार केंद्र चालक अशी आहे ,यापैकी केवळ २३ जणांनी सहभाग नोंदवला होता.ज्येष्ठ लिपिक ,ऑपरेटर हे उपस्थित होते.
संजय गांधी निराधार अनुदान योजना
लाभार्थी:
या योजनेतंर्गत 65 वर्षाखालील निराधार पुरुष व महिला, अनाथ मुले, अपंगातील सर्व प्रवर्ग, क्षयरोग, कर्करोग, एड्स, कुष्ठरोग यासारख्या आजारामुळे स्वत:चा चरितार्थ चालवू न शकणारे पुरुष व महिला, निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह ),
घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारित व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला तृतीयपंथी, देवदासी,3
5 वर्षावरील अविवाहीत स्त्री, तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी, सिकलसेलग्रस्त या सर्वांना लाभ मिळतो.
या योजनेमध्ये दारीद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असणे अथवा रुपये 21,000/- पर्यंत कौटुंबिक वार्षिक उत्पन्न असणे आवश्यक आहे.
फायदे:
या योजनेखाली पात्र होणा-या कुटूंबात एक लाभार्थी असल्यास रुपये प्रतिमहा तर एका कुटूंबात एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यास, रुपये प्रतिमहा इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.
दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव :- दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत पुरावा. रहिवासी दाखला :- ग्रामीणभागामधील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
लाभार्थी:
गट (अ) :-65 व 65 वर्षावरील व दारिद्रय रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव समाविष्ट असणाऱ्याव्यक्तीना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट (अ) मधून रु.400/- प्रतिमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते याच लाभार्थ्याला केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे रु. प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन दिले जाते. यामुळे या लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून रु. प्रतिमहा व केंद्र शासनाकडून
प्रतिमहाअसे एकूण प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन मिळते.
गट (ब):-या योजनेतंर्गत ज्या व्यक्तीचे वय 65 व 65 वर्षावरील आहे व ज्यांचे कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न रुपये 21,000/- च्या आत आहे, अशा वृध्दांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना (गट- ब) मध्ये रुपये प्रतिमहा प्रतिलाभार्थी निवृत्तीवेतन राज्य शासनाकडून देण्यात येते.
अर्ज कसा करावा
अर्जदार तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय, आपले सरकार सेवा केंन्द्र या ठिकाणी अर्ज करु शकतो. संपर्क कार्यालयाचे नाव-तहसलिदार संजय गांधी योजना/तलाठी कार्यालय,आपले सरकार सेवा केंन्द्र