नागरिकांच्या समस्या व विकास कामाला प्रथम प्राधान्य देणार – मुख्याधिकारी अजय पाटणकर

63

मूल – नगर पालीका क्षेत्रातील नागरीकांच्या समस्या पक्षीय भेदभाव न करता तात्काळ सोडविण्याला आपण प्रथम प्राधान्य देन्याचा प्रयत्नकरणार. रुजु होताच नगराची प्रत्यक्ष पाहणी केली असता शहरात अनेक विकासात्मक कामे झालेले आहेत, तरीही अनेक विकासात्मक कामेकरण्याची संधी मला आहे. हे करण्यासाठी नगर पालीकेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याची आवश्‍यकता असुन जागरूक पत्रकार म्हणूनआपणही मला समस्या लक्षात आणून देऊन मला सहकार्य करावे जेणे करुन नागरीकांचे काम पुर्ण होणे महत्वाचे असल्याचे मत मूल नगरपरिषदेत नव्याने रुजु झालेले मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी व्यक्त केले. दिनांक १० सप्टेंबर २०२२ रोजी नगर परिषदेच्या 35 व्या वर्धापणदिनानिमीत्य बोलत होते.

मुख्याधिकारी सिध्दार्थ मेश्राम यांची बदली झाल्यानंतर मूल नगर परिषदेचा कार्यभार सावलीच्या मुख्याधिकारी मनिषा वजाळे यांच्याकडेसोपविण्यात आला होता, अनेक दिवसानंतर मूल नगर परीशदेला कायम मुख्याधिकारी मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.गोंदिया जिल्हातील देवरी येथील नगर पालीकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर यांनी नुकतेच नगर परिषदेचा प्रभार स्वीकारला आहे.याप्रसंगी नगर परिषदेचा वर्धापन दिंन मुख्याधिकारी यांचेहस्ते केक कापून साजरा करण्यात आला. परिषद स्थापनेचे चार वर्ष प्रशासकीयराजवटीत गेले त्यानंतर १९९१ ला परिषदेची प्रथम निवडणूक झाली आणि प्रथम नगराध्यक्षाचा मान प्रतिष्ठित व्यापारी धनजीभाई शहा यांनी प्राप्तकरेलानंतर सात महिला सहा सात पुरुष नगराध्यक्ष पदावर विराजमान झाले.

सर्वांनीच आप आपल्या परीने विकासाचा गाडा हाकला तरी मागील सहावर्षात विकासाला खरी चालना मिळाली.असे मनोगत प्रशासकीय अधिकारी विनोद येनुरकर, श्रीकांत समर्थ,पत्रकार विनायक रेकलवार,अशोकयेरमे यांनी व्यक्‍त करतांना विकास हा मुख्य मार्गावर दिसत असून अंतर्गत वस्तीतला विकास बराच शिलुलक असल्याचे सांगितले. पत्रकारसंघाच्या वतीने मुख्याधिकारी अजय पाटणकर यांचा पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. पाटणकर यांनी नगराचा विकास व नागरिकांचेकाम करणे हेच आपले ध्येय आहे.

यासाठी आपलेही मला सहकार्य आवश्‍यक असल्याचे मत व्यक्‍त केले. नगरात गावठी डुकराचेहैदोस,अतिक्रमण, कित्येक वर्षापासून रेंगाळत असलेला विहीर गावचा रस्ता याला प्राधान्य देऊन पूर्ण करावे अशी आठवण मुख्याधिकारी चेंबरमधे पत्रकार गुरु गुरनुले भोजराज गोवर्धन यांनी करुन दिली. यानिमित्त पर्यावरण दुत राहुल आगळे यांना वृक्ष भेट दिले. कार्यक्रमाचे संचालनआरोग्य निरीक्षक अभय चेपुरवार,यांनी केले. भेटी दरम्यान पत्रकार राजू गेडाम, गुरु गुरनुले,अशोक येरमे, भोजराज गोवर्धन, विनायकरेकलवार,रवींद्र बोकारे, आणि वसुंधरा ग्रुपचे कर्मचारी व अन्य कर्मचारी उपस्थित होते.