मुल तालुक्यातील शहरातील ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड घेवून जावे-प्रमोद मशाखेत्री

47

स्माट काड काढले  ते प्रगती काॅम्यूटर मूल मध्ये पडून

राज्य परिवहन महामंडळाच्या  विविध योजनांचा लाभ घेऊन    सवलतीच्या दरात प्रवास करणाऱ्या  लाभार्थीना १ सप्टेंबरपासून स्मार्ट काई
बंधनकारक करण्यात येणार आहे.  त्यामुळे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी   मागील काही महिन्यांपूर्वी   मोठ्या रांगा लावल्या होत्या. अनेकांचे  स्मार्ट कार्ड बणून आले. परंतु,   अनेकांनी आगारातून स्मार्ट कार्ड नेलेच नाही. त्यामुळे ज्यांनी स्मार्ट काई  काढलेहोते. त्यांनी संबंधित  प्रगती काॅम्यूटर मूल

 स्मार्ट कार्ड घेऊन जावे, असे आवाहन  केले आहे.
ज्येष्ठ नागरिक राज्य परिवहन  महामंडळातर्फे विविध प्रकारच्या  योजना राबविण्यात येतात.

त्यांना सवलतीच्या दरात प्रवास करता येतो.  आताया योजनांचा लाभघेण्यासाठी १  सप्टेंबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक
करण्यात आले आहे. स्मार्ट काई  असल्याशिवाय आता सवलतीचा   प्रवास करता येणार नाही.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातर्फे (एसटी) ज्येष्ठ नागरिक, तसेच विविध सामाजिक घटकांना प्रवासभाड्यात सवलत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘स्मार्ट कार्ड’ योजनेला ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

एसटी महामंडळाच्या वतीने विविध घटकांसाठी १ जून २०१९ पासून स्मार्ट कार्ड योजना सुरू करण्यात आली असून आतार्यंत या योजनेसाटी  व्यक्तींची नोंद झाली आहे. या योजनेसाठी ज्येष्ठ नागरिक, पुरस्कारप्राप्त व्यक्ती, विद्यार्थी तसेच रुग्णांना स्मार्ट कार्ड देण्यात येते.

१ सप्टेंबर २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक –

करोना संसर्ग, एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या संपामुळे एसटीच्या विभागीय कार्यालयात स्मार्ट कार्ड नोंदणीकरण आणि वितरण करता आले नाही. या योजनेला ३१ मे २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. आता पुन्हा एकदा ३० ऑगस्ट २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याची माहिती एसटी महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रा असल्यामुळे या यात्रेमध्ये ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून ही मुदतवाढ देण्यात आली आहे. १ सप्टेंबर २०२२ पासून स्मार्ट कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.