मुल येथे आज तालुका स्तरीय आरोग्य आजादी अमृतमहोत्सव निर्मीत्य आरोग्य मेळाव्यात तपासणी

58

मेळाव्यात 823 रूग्णांनी सहभागी होऊन त्यापैकी 145 बिपीचे तपासणी,137 शुगर तपासणी,18 टिबीच्या तपासण्या करण्यात आले. आरोग्य सेवेचा लाभ घेतला.
मुल:- गोरगरीब व सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी केंद्र सरकारने आयुष्यमान भारत योजना सुरू केली. ही योजना सर्वसामान्य नागरिकंासाठी लाभदायक आहे. आपल्या आरोग्यास काही झाले तर एका क्लिकवर त्या डाॅक्टरला त्या व्यक्तीची सर्व प्रकारची माहिती मिळते व उपचार तातडीने होते, अशी माहिती   दिली.
येथील मुल उपजिल्हा रूग्णालयात महाआरोग्य मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याचे उदघाटन मा.श्री.मल्लीकाअर्जुन इंगळे,उपविभागीय पोलीस अधिकारी,कार्यक्रमाचे अध्यक्षः डाॅ.निवृत्ती राठोड जिल्हा शल्यचिकीत्सक जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर यांच्या हस्ते झाले.
प्रास्ताविक निवासी वैद्यकिय अधिकारी जिल्हा सामान्य रूग्णालय चंद्रपूर डाॅ.हेमचंद कन्नके यांनी केले.

यावेळी मा.श्री.डाॅ.रविंद्र होळी,तहसिलदार,मुल,नायब तहसिलदार पृथ्वीराज साधनकर,
मा.श्री सतिशसिंह राजपुत,पोलीस निरीक्षक पो.स्टे.मुल
मा.श्री.सुनिल कारडवार गटविकास अधिकारी पंचायत समिती मूल.मा.श्री वैभव खांडरे,गट विकास अधिकारी , डाॅ.राजकुमार गहलोत,जिल्हा आरोग्य अधिकारी,जिल्हा परिषद चंद्रपूर,डाॅ.समेध खोब्रागडे तालुका आरोग्य अधिकारी,मुल डाॅ.उज्वल इंदुरकर वैद्यकिय अधिक्षक उपजिल्हा रूग्णालय मुल उपस्थित होते.
डाॅक्टरांच्या चमूने विविध रोगावर उपचार केला. या महाआरोगय मेळाव्यात 823 रूग्णांनी सहभागी होऊन आरोग्य सेवेचा लाभ घेतला. त्यापैकी 145 बिपीचे तपासणी,137 शुगर तपासणी,18 टिबीच्या तपासण्या करण्यात आले.

45 लोकना दूरसंचार ने ..उपचार दिनात आला...45 मोतीबिंदू चे पीटी तपसनी कन्यात आले

कुटंुबकल्याण कार्यक्रमांतर्गत जागरूकता निर्माण व्हावी,यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.