शेतकरी,छोटया दुकानदारांवर शासन मदतीत अन्याय

58

मूल तालुका : कोरोनातील लॉकडाउुनमुळे मोठे नुकसान शासनाने मदत करण्याची मागणी

मूल :— शासनाने कोरोना काळात अनेकांना मदत केली.मात्र,शेतकरी व छोटया दुकानदारांवर शासनाने मदतीच्या बाबतीत अन्याय केला. त्यामुळे शेतकरी व छोटया दुकानदारांमधून संताप व्यक्त केला जात आहे.संचारबंदी काळात शासन अंत्योदय लाभाथ्याना दोन किलो तांदूळ,तीन किलो गहू मोफत देणार आहे. श्रावणबाळ,संजय गांधी,निराधार योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्टीय विधवा निवृत्तीवेतन योजना,दिव्यांग निवृत्तीविेतन योजना,नोंदणीकृत बांधकाम मजूर,फेरीवाले,रिक्षावाले यांना आर्थीक मदतीचा लाभ पुढे केला.त्यांना यातून थोडीथोडकी मदत होणार आहे पण, देशाचा कणा असलेला शेतकरी,शेतमजूर,आणि ग्रामीण भागातील छोटे व्यावसायीक ज्यंाची हातावर आणून पानावर खाण्याची स्थिती आहे. त्यांचा शासनाने कोणताही विचार न केल्याने ग्रामीण जनतेची शासनप्रती नाराजी असल्याचे मुल शहरासह तालुक्यात दिसून येत आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ व देशाचा कणा समजला जाणारा शेतकरी दरवर्षी कोणत्या कोणत्या संकटाचा सामना करतो आहे. त्यातच मागील वर्षी निसर्गाने दगा दिल्याने मेटाकुटीस आलेल्या शेतक—याला कोरेानाच्या महामारीच्या मोठा फटका बसला असून आजघडीला शेतकरी खचला असला तरी हिमत्तीने अजूनही परिस्थीतीशी लढतोच आहे. मशागतीचे भाव वाढले असले तरी मालाच भाव 14 वर्षापूर्वी होते तेच आहेत.

शासनाने शेतकरी,शेतमजूर आणि छोटे व्यावसायीक यांनाही पॅकेजमध्ये सामावून घेण्याची मागणी मूल शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांनी केली आहे.