मूल तालुक्यातील 16 नविन पुलांमुळे रहदारीचा मार्ग मोकळा

78

मूल तालुक्यातील 16 नविन पुलांमुळे रहदारीचा मार्ग मोकळा

मूल: मूल तालुक्यात सुमारे 16 नविन पुलांचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम उपविभागाने पुर्ण केल्याने नागरीकांना पुरांच्या त्रासापासुन सुटका झाली आहे.जनतेला पावसाचा होणारा त्रास दुर करण्याच्या दृष्टीने मागील सरकाराने अर्थसंकल्पात 26 नविन पुलांसाठी निधी मंजुर झाली होती. यामधील हळदी ते नलेश्वर या मार्गावर 3 पुलांचे काम पुर्ण झाले. चिचाळा ते कवळपेठ यामार्गावर 2, जानाळा ते सुशी मार्गावर 2, नवेगांव-कोरंबी-बेंबाळ मार्गावर 3, मूल ते चामोर्शी 1, चिखली ते कन्हाळगांव मार्गावर 1, पेठगांव भादुर्णी मार्गावर 2, फिस्कुटी ते गडीसुर्ला मार्गावर 1 तर सिंताळा ते फिस्कुटी 1 पुलांचे काम पुर्ण झालेले आहे. तर काही पुलांचे काम अंतीम टप्पयात आहे, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले यांनी शाखा अभियंत्यांना मार्गदर्शन करून व वारंवार कामाच्या ठिकाणी जावुन तात्काळ काम पुर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. सदर मार्गावरील काही रस्त्याच्या रूंदीकरणाचे कामे पुर्ण करण्यात आले आहे तर रूंदीकरणाचे काम शिल्लक असलेल्या रस्त्याचेे काम काही दिवसात पुर्ण करण्यात येणार असल्याने नागरीकांना ये-जा करण्यासाठी सुलभ होणार आहे.