राष्ट्रवादी कांग्रेसचे वनविभागविरोधात आंदोलन

56

दिनांक ०४-०१-२०२३ रोज बुधवारला सकाळी ११.०० वाजता मूल येथे वन्य प्राण्यांमुळे होत असलेल्या वारंवार त्रासामुळे वनविभाग तथा शासनाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य , राष्ट्रवादी किसान सेल चे अध्यक्ष तथा ओबीसी नेते जगदीश जूनघरी , चंद्रपूरचे माजी नगरसेवक राजेंद्र आखरे ह्यांच्या उपस्थितीत बल्लारपूर विधानसभा क्षेत्र अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुमीत सुरेशराव समर्थ ह्यांच्या नेतृत्वात ठीय्या आंदोलन गांधी चौक मूल येथे भव्य स्वरूपात आयोजित करण्यात आले !
सदर आंदोलनात सुमारे 2000 च्या वर उपस्थिती दर्शवून शेतकरी बांधवांनी राज्य सरकारच्या विरोधात बहुसंख्येने रोष दर्शवून निषेध करण्यात आला !
सदर आंदोलनात सुमीत समर्थ ह्यांनी राज्य सरकारच्या व वनविभागाच्या निष्काळजी पणामुळे वन्यप्राण्यांच्या व्यवस्थापनाकडे संपूर्ण दुर्लक्ष करून संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी व शेतमजूर ह्यांच्यावर उपासमारीची पाळी आणलेली आहे असे प्रतिपादन करून महाराष्ट्र सरकारवर कडाडून टीका केली !
वनविभागाच्या निष्क्रिय व हिटलरशाही पणा मुळे होत असलेल्या वन्यप्राण्यांमुळे समस्त गावकऱ्यांना होत असलेल्या अडचणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तथा देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार व खासदार सुप्रिया ताई सुळे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील विरोधीपक्ष नेते अजित पवार ह्यांच्यापर्यंत नक्की पोहचवून मूल तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवाना व समस्त जनतेला न्याय मिळवून देण्याकरिता सदैव प्रयत्न करीन असे आश्वासन दिले !
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच फक्त जनतेला न्याय मिळवून देऊ शकते असा विश्वास सुमीत समर्थ ह्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना दर्शविला !
ह्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस चे जेष्ठ राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेल चे अध्यक्ष जगदिश जूनघरी , तालुका अध्यक्ष किसन वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे , ह्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले तसेच सर्व उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वनविभागाच्या विरोधात निदर्शने देऊन गांधी चौक ते तहसील कार्यालय पर्यंत पदयात्रा काढून ढोल – ताशा चा भव्य डपरा समूहाच्या आवाजात परतवाघ रुपधारण करून देखावा ह्यांचे रॅली व महाराष्ट्र सरकार च्या विरोधात एक अनोख्या भव्य उपस्थितीत निदर्शने देऊन तहसील कार्यालय येथे निवेदन देण्यात आले !
व ह्यांनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या मागणीवर लाफरवाही केल्यास व संबंधीत विभागासोबत बैठक न लावल्यास सदर आंदोलन पुन्हा ह्यापेक्षा भव्य स्वरूपात तीव्र आंदोलन घेण्याचा ईशारा सुद्धा देण्यात आला !
सदर आंदोलन यशस्वी होण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष किसन वासाडे , शहर अध्यक्ष भास्कर खोब्रागडे , तालुका महिला अध्यक्ष नीता गेडाम , शहर महिला अध्यक्ष सौ अर्चना चावरे, युवक तालुकाध्यक्ष समीर अल्लूरवार , शहर कार्याध्यक्ष महेश जेंगठे, युवा नेते बंडू साकलवार , प्रा.प्रभाकर धोटे , नंदू बारस्कर अनिकेत मारकवार , शहर उपाध्यक्ष दुष्यांत महाडोळे तालुका सचिव ज्ञानेश्वर वाघमारे , विकास गुरनुले , अजय त्रिपत्तीवार , नंदू बारस्कर प्रभाकर धोटे , हेमंत सुपणार , , लाला साळवे , शुभम शेंडे , नवनीत चिंचोलकर , मारोती शेंडे, मंगल मशाखेत्री , साई पेंदोर ,रोहिदास वाढई, सतीश गुरनुले , सुरेश शिंदे , संदीप तेलंग ,बालाजी लेनगुरे ,राहुल तोटावार , संध्या निकुरे , जयश्री झरकर , विपुल ठिकरे, गिरीधर उईके , किशोर खंडाळे , देवा भुरसे , नंदकिशोर गुरनुले , साई पेंदोर , गणेश गायकवाड , सुरेश गावतुरे , विनायक निकोडे दिनेश कोल्हटवार ,दिवाकर चौधरी , लालचंद मेश्राम , आदी बहुसंख्य पदाधिकारी हजारो च्या संख्येने जणआंदोलन स्वइच्छेने रॅलीत सहभागी होते !