मूल बसस्थानक बनले समस्यांचे माहेरघर ,समस्या तात्काळ मार्गी लावा – शोभाताई फडणवीस

131

महाराष्ट्र राज्य माग परिवहन महामंडळ आधिनस्त येथील बस स्थानकाच्या बांधकामाची प्रक्रिया ऑक्टोबर २०१६ पासून सुरू झाली. ८ कोटा
रूपये खर्चून निर्माण होणा-या बस स्थानकाचे कंत्राट वर्धा येथील पार्थ कन्स्ट्रक्शन कंपनीने स्विकारले. कामाच्या आदेशापर्यंत मार्च २०१८ पर्यंत
कंत्राटदारास काम पुर्ण करावयाचे होते. परंतु प्रशासनातील तांत्रीक अडचणी आणि कामाच्या पथ्दतीमूळे येथील बस स्थानकाच्या कामास

फेबुरवारी २०१८ पासून सुरू झाले. कामाच्या आदेशाप्रमाणे २०१८ पासून सुरू झालेले काम २०२० पर्यंत पुर्णत्वात यायला पाहिजे होते. परंतू दोन
वर्षे जास्त होवनही सदर काम पर्ण झालेले नाही.

सदर काम पुर्ण करण्यासाठी संबंधीत कंत्राटदारास दोनदा मुदतवाढ देवुनही काम पुर्ण होत नाही शिवाय आधुनिकीकरणाच्या नांवाखाली
बांधकाम होत असलेल्या येथील बस स्थानकावर अनेक समस्या असल्याने प्रवाश्यांसह विद्याथ्र्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
याबाबतची वास्तविक परिस्थिती पाहण्यासाठी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी आज सकाळी समर्थकांसह बस स्थानकावर आक्रमण
केले. स्थानकाचा फेरफटका मारला तेव्हा जुने ते सोने म्हणत नवीन होत असलेल्या बस स्थानका पेक्षा जुनेच बस स्थानक व्यवस्थीत होते. असे
मत व्यक्त केले. स्थानकावरील प्रवाड्यांची वर्दळ लक्षात घेता निर्माण केलेले महिला आणि पुरूषांकरीतांचे शौचालय मोजकेच असल्याचे
निदर्शनास आले. प्रवाश्यांसाठी पिण्यासाठी शुध्द, थंड व मुबलक पाण्याचा अभाव असल्याचा दिसून आला. स्थानकाच्या परिसरात लावलेले गटू
उद्‌्घाटनापूर्वीच उखळत असल्याचे दिसून आले, स्थानकावरून धावणा-या बसेसची संख्या लक्षात घेता एस.टी बसेस उभ्या करण्यासाठी जागा
अप्री पडत असलयाचे दिसून आले.

नियमित वाहतुक नियंत्रक नसल्याने अन्य कर्मचा-यांच्या खांदयावर भार ठेवून वाहतुक नियंत्रकाचे काम केल्या जात आहे. स्थानकावरून
धावणा-या लाल पिवळया बसेस मध्यें विद्याथ्र्यांना बसु दिल्या जात नाही, स्थानकाची स्वच्छता नियमीत होत नसल्याने स्थानकाच्या परिसरात
स्वच्छतेचा अभाव आणि दुर्गंधीयुक्त वातावरण दिसून आले. अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसून आले. पुरेश्या मुता-या अभावी
प्रवाशी उघडयावर गरज भागवताना दिसून आले. तंबुसारखे आच्छादन असलेल्या स्थानकावर पुरेसी विद्युत व्यवस्था नाही, स्थानकावर
बांधलेले दुकान अजूनही अपुर्ण आहेत. कर्मचारी विश्रांती कक्ष आणि कार्यालयात पंखे आणि प्रकाश व्यवस्था नाही. स्थानकावर लावलेल्या
स्पारटेक्स चोपडया असल्याने प्रवाशी घसरून पडण्याची भिती आहे. स्थानकावर जादा बसेस सोबतचं विद्यार्थ्यांसाठी मानव मिशन योजनेच्या
बसेस नसल्याने चामोर्शी, सुशी, बेंबाळ, येरगांव, पिपरी दिक्षीत, चिरोली, केळझर मार्गावर विद्याश्र्यांच्या वेळेवर बसची व्यवस्था नसल्याने
विद्यार्थ्यांना उशीरा रात्रो पर्यंत बसच्या प्रतिक्षेत स्थानकावर राहावे लागते. आदि समस्या निदर्शनास आल्याने शोभाताई आक्रमक झाल्या.
वाहतुक नियंत्रकाचा प्रभार सांभाळणारे फुलचंद खोब्रागडे यांची भेट घेवून समस्यांचे निवेदन दिले. दरम्यान चंद्रपूर विभाग नियंत्रक सुठावणे
मॅडम यांचेशी संपर्क साधून स्थानकावरील समस्यांचा येत्या आठवडा भरात निपटारा करण्या सोबतचं स्थानकाचे अपुर्ण काम लवकरात लवकर
पुर्ण करावे, अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला. यावेळी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अविनाश जगताप, लोकनाथ
नर्मलवार, विपीन भालेराव, सुरज मांदाडे, अविनाश वरगंटीवार, संतोष चिताडे, साहील येनगंटीवार, अशोक बुटले, संजय मारकवार, मिलींद
हेडावू आदि कार्यकर्ते आणि प्रवाशी मोठया संख्येने होते.