श्री साई मित्र परिवार मूल व संस्कार कलश ग्रुप मुल तर्फे तहसील कार्यालय परिसरात महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त थंडगार पाण्याची पानपोई लावण्यात आली. उन्हाचा तडाखा वाढत आहे. ऊन 45 अंश सेल्सिअस पर्यंत वाढत असल्याने अंगाची लाहीलाही निर्माण होत आहे.
मूल तहसील कार्यालयात तालुक्यातील विविध शासकीय कामासाठी शेतकरी,शेतमजूर कामगार व नागरिक येत असतात. अशा परिस्थितीत विकत पाणी घेऊन पिणे हे ग्रामीण भागातील नागरिकांना न परवडणारे आहे. तहसील कार्यालयाजवळ पाणपोईचे अत्यंत आवश्यकता असल्याचे लक्षात येताच मूल येथील सामाजिक संस्था ही साई मित्रपरिवार मूल व संस्कार कलश ग्रुप मूल यांच्यातर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे अवचित्त साधून पानपोई लावण्यात आली.
तहसील कार्यालय परिसरात पाणपोईची सोय केल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाटसरू, नागरिकांनी आपली तहान भागवत आयोजकांचे आभार मानले.