अर्ज भरण्याची मुदत दि.२०.१२.२०२१ पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी

41

#आवश्यकते नुसार अर्ज भरण्याची मुदत दि.२०.१२.२०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे, तरी सर्वांनी नोंदणी आणि योजनेसाठी अर्ज लवकरात लवकर करण्याची दक्षता घ्यावी.

सर्वांनी नोंदणी आणि योजनेसाठी अर्ज लवकरात लवकर करण्याची दक्षता घ्यावी.

अर्जदार नोंदणी करताना कृपया मोबाईल नंबर पुन्हा तपासून पाहावे. एकदा नोंदणी झाल्यानंतर बदल करता येणार नाही.

या योजनेमधील अर्जदारांची प्रतिक्षाधीन यादी पुढील ५ वर्ष ग्राह्य धरली जाईल.

 

AH-MAHABMS मोबाइल अप्लिकेशन गूगल प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.

महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, नगरपालिका, कटकमंडळे या कार्यक्षेत्रातील रहिवाश्यांना उपरोक्त योजना लागू नाहीत. ग्रामीण भागातील रहिवाश्यांना योजनेचा लाभ घेता येणार आहे.

योजने अंतर्गत अंतिम निवड झाल्यानंतर बंधपत्र लाभार्थीने देणे बंधनकारक राहील.

नाविन्यपूर्ण आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत अर्जदार नोंदणी व योजनेसाठी करावयाचा अर्ज याकरिता AH MAHABMS हे App प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करावे.

योजने संदर्भात अधिक माहिती करिता योजनेचा तपशील पाहावा.

मोबाइल अ‍ॅप वापरकर्त्यांना सूचना – कृपया AH MAHABMS हा मोबाइल अ‍ॅप प्ले स्टोर वरुण अपडेट करावा.

कॉल सेंटर संपर्क – 1962 (10AM to 6PM).

टोल फ्री संपर्क – 18002330418 (8AM to 8PM).

 

 

सन 2021-22 या वर्षात नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशीचे गट वाटप करणे, शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1000 मांसल कुक्कुट पक्ष्यांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीसाठी अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिल्लांचे वाटप व 25+3 तलंगा वाटप या योजनांसाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थी निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. पशुपालकांना डेअरी पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या  बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे, त्याची निवड करण्याची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक ,शेतकरी बांधव, सुशिक्षित बेरोजगार युवक युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.

विविध योजना उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक, शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध असलेल्या शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्यावतीने वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजनेमध्ये तीन वर्षापासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पद्धत सुरू केली आहे. याबरोबरच जिल्हास्तरीय विविध योजनांसाठी संगणक प्रणाली लागू करण्यात येत आहे. यामध्ये शासनाने एखाद्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्या लाभार्थ्यास दरवर्षी अर्ज करावे लागू नये, यासाठी तयार केलेली प्रतीक्षा यादी पुढील 5 वर्षापर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. त्यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून त्यांना प्रतीक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल, हे कळू शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी https://ah.mahabms.com हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून AH-MAHABMS हे अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन गुगल प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे. अर्जदारांनी 4 डिसेंबर ते 18 डिसेंबर 2021 या कालावधीत अर्ज सादर करावा. काही अडचण उद्भवल्यास  1862 किंवा 1800-233-0418 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.

योजनांची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबत संपूर्ण तपशील पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज करणे अत्यंत सुलभ करण्यात आले आहे. बहुतांशी माहितीबाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालक अर्ज भरण्याकरिता स्वतःचा मोबाईलचा देखील वापर करू शकतात. अर्ज भरताना अर्जदाराने नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदाराने योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये.

विभागाच्या योजनेबाबत अधिक माहितीसाठी दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार), पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी अथवा जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालय, तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय किंवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रावर संपर्क साधावा, असे आवाहन असे आवाहन पशुसंवर्धन विभागामार्फत करण्यात आले आहे.