स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी भरती

42
जिल्हयात 420 सुरक्षा रक्षकांची भरती
चंद्रपूर, दि. 29 ऑक्टोबर : स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिक प्रवर्गातून राज्यात 7425 सुरक्षा रक्षक भरती करण्यात येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात माजी सैनिक प्रवर्गातून 420 सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करावयाची आहे. त्याअनुषंगाने सदर पदाकरीता ईच्छुक सैन्य दलातील सेवानिवृत्त व पात्रता पूर्ण करीत असलेल्या जिल्हयातील माजी सैनिकांनी 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत डिस्चार्ज बुक, ओळखपत्र व रोजगार कार्डसह जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष भेट देत स्व:ताचे नाव नोंदवावे. असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कॅप्टन दिपक लिमसे यांनी केले आहे.
हि आहे पदासाठी पात्रता:
सुरक्षा रक्षक पदाकरीता, माजी सैनिकाचा जन्म 30 सप्टेंबर 1976 च्या अगोदरचा नसावा. शैक्षणिक पात्रता
शिक्षण कमीत कमी 8 वी पास मात्र, बारावी उत्तीर्ण नसावा. सैन्य दलातील सेवा कमीत कमी 15वर्षे झाली असावी. सैन्यदलातील हुद्दा हवालदार किंवा त्यापेक्षा कमी असावा, सैन्य दलातील वर्तण व चारीत्र्य चांगले असावे तसेच सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर उमेदवाराला कोणताही आजार अथवा अपंगत्व नसावे. उमेदवार शारिरीकदुष्टया सक्षम असावा. तरी, जिल्हयातील जास्तीत जास्त माजी सैनिकांनी आपल्या नावाची नोंद कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष येऊन करावी, असे जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.