वाघाच्या हल्लयात शेतकरी ठार उपक्षेत्र पाथरी अंतर्गत गेवरा.खुर्द येथील घटना शेतकऱ्यांत भितीचे वातावरण

41

सावली :: शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांवर वाघाने हल्ला करुन ठार.करण्याची घटना नुकतीच घडली,शालीकराम मनिराम चापले(३५) असे मृतकाचे नाव.असुन तो गेवरा खुर्द.येथील. रहिवासी होता..
.मिळालेल्या माहिती नुसार धानपीकाचे रोवणे संपूर्ण निंदणाच्या कामाला सुरुवात झाली ,त्यांमुळे अनेक शेतकरी शेतात काम करीत असताना दिसतात ,सोबतच सावली तालुक्यातील अनेक ग्रामीण भाग हा जंगल व्याप्त असुन ,गावालगत ,शेतीलगत जंगल.अशी.परिस्थिती असताना या भागात नेहमीच वन्यजीवाचा हौदोस दिसुन. येत.आहे, त्यामुळे जिवाची कोणती पर्वा.न.करता.आणि वन्यजीवाला न.घाबरता या भारतील.जनता आपले जीवन जगत आहेत ,घटनेच्या दिवशी मृतक हा शेतात काम करण्यासाठी गेला असता शेतालगत असलेल्या जंगल.परिसरात दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला.करुन त्याला जागीच ठार.केले.आणि जंगल परिसरात ओढत.नेले..
घटनेची माहीती होताच परिसरातील जनता धावून आली , वनकर्मचारी धावून.आले, मौका.पंचनामा करण्यात आला.पाथरी उपक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या गेवरा.खुर्द.या गावातील मृतकास तातडीने 25 हजाराची मदत देण्यात आली, परिवारातील.कमावता .पुरुष वाघाच्या हल्लयात ठार झाल्याने. कुटुंबात दुखाचे डोंगर तर गावात शोककळा पसरली आहे.।।
..वाघाच्या हल्लाने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले असून या.परिसरात शेती कामासाठी बाहेर निघणे कठीण होऊन बसले आहे त्यामुळे अशा नरभक्षी वाघाला त्वरीत जेरबंद करण्यात यावे.अशी मागणी जोर.धरत.असून ,सातत्याने याभागात मनुष्य.जीव वन्यजीवाचा भक्ष बनत.आहे.